आदर्श प्रशाला, सरनाईक कॉलनी,
जुना वाशी नाका, कोल्हापूर
इयत्ता : आठवी
विषय : इतिहास
प्रकरण : तिसरे
ब्रिटिश सत्तेचे परिणाम
विद्यार्थ्यांना या प्रकरणाचा पाठ्यांश सहजरित्या समजावा यासाठी हे मुद्दे काढलेले आहेत . ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचावेत, ही अपेक्षा !
निर्मिती : डी. पी.सुतार
आदर्श प्रशाला, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : 9822206921
9834151691
प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे :
पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आले.
इंग्रजांना पोर्तुगीजांचा विरोध झाला. नंतर पोर्तुगीजांशी मैत्री होऊन विरोध कमी झाला . भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीश यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले .
मुंबई आणि त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा प्रयत्न इंग्रज करू लागले परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती . माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव याने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश झाला.
इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली . 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले .
गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले .
तैनाती फौज म्हणजे इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन होय
तैनाती फौजेच्या अटी :
इंग्रजांचे लष्कर आपल्या राज्यात ठेवावे.
लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा.
इतर सत्ताधीशांची इंग्रजांच्या मद्यस्थीनेच संबंध ठेवावे.
इंग्रजांचा प्रतिनिधी आपल्या दरबारी ठेवावा .
दुसऱ्याबाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
हा करार काही मराठा सरदारांना मान्य नव्हता .त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले .या युद्धात इंग्रजांच्या विजयामुळे त्यांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला .तो हस्तक्षेप असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्याचा पराभव झाला .1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली .
इंग्रजांनी मुघलांची राजधानी दिल्ली जी दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. त्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला .
इंग्रजांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची मदतनीस म्हणून नेमणूक केली .
नंतर प्रताप सिंह यांना गादीवरून करून काशी ते ठेवण्यात आले .तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला .
या अन्यायाविरुद्ध प्रतापसिंह यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही .पुढे लॉर्ड डलहौसी यांनी दत्तकविधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे संस्थान खालसा केले.
ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम :
रॉबर्ट क्लाइव्ह ने दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये अस्तित्वात आणली .महसूल गोळा करण्याचे काम कंपनीकडे आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम नवाबाकडे ठेवले .
दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम :
1.कररूपाने जमा झालेले पैसे कंपनीचे अधिकारी स्वतःकडेच ठेवू लागले .
2.भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्याने अन्य व्यापारी कंपन्या नाराज झाल्या.
3.कंपनीच्या भारतातील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली .
4.कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही कायदे केले ते पुढील प्रमाणे :
अ ) 1773 च्या रेग्युलेटिंग एक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला तसेच त्याला मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ही मिळाला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज हा गव्हर्नर जनरल झाला .
आ ) 1784 च्या पिटच्या कायद्याने भारतातील कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले .या मंडळाला कंपनीला राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला .
मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांचे भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते
अ ) मुलकी नोकरशाही :
लॉर्ड कॉर्नवालीस यांनी नोकरशाहीचे निर्मिती केली. हा शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने केला त्यासाठी त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले .
ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख म्हणून नेमला. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिविल सर्विस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली .
आ) लष्कर :
प्रदेशाचे संरक्षण नवे प्रदेश हस्तगत करणे इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे हे लष्कराचे काम होते .
इ ) पोलीस दल : कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते
ई ) न्यायव्यवस्था :
प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले .
त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालये स्थापन केली .
इंग्रज भारतात येण्यापूर्वी वेगवेगळे कायदे आणि न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असे.
इंग्रजांनी लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली .
सर्व भारतात एकच कायदा लागू केला .
कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व रूढ केले .
इंग्रजांनी सुरू केलेल्या या न्यायव्यवस्थेत ही दोष होते :-
अ) युरोपियन लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे होते .
आ) न्याय ही बाब लोकांना खूप खर्चिक वाटत होती .
इ) खटले वर्षानुवर्षे चालत.
इंग्रजांची आर्थिक धोरणे :
इंग्रज आणि आपल्या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात सुरू केली त्यामुळे इंग्लंडचा फायदा झाला परंतु भारताचे आर्थिक शोषण झाले.
इंग्रज पूर्व काळात शेतसारा पिकानुरूप आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. शेत सारा प्रामुख्याने धान्य रूपात घेतला जात असे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी जमीन काढून घेतली जात नसे.
इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा निश्चित केला. शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे होती.
शेतसारा वेळेत भरण्यासाठी शेतकरी येईल त्या किमतीला पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले .
शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाले नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत असत .
इंग्रज येण्यापूर्वी भारतात शेतकरी अन्नधान्य पीकवत असत आणि त्यामुळे गावातच सर्वांची गरज भागवली जात असे
इंग्रजानी कापूस, तंबाखू, चहा या पिकांचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन दिले. अन्नधान्याच्या ऐवजी नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात.
1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. पाणी पुरवठा योजनांवर ही फारसा खर्च केला नाही .
इंग्रजांनी व्यापाराची वाढ व्हावी आणि प्रशासनाची सोय व्हावी यासाठी भारतात वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या .कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. मुंबई-ठाणे रेल्वेमार्गावर आगगाडी धावू लागली. तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा भारतात सुरू झाली. भारतात डाक व्यवस्था ही सुरू करण्यात आली.
या सर्व सुधारणांमुळे देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली .
भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास :
भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जास्त कर आणि इंग्लंड मधून भारतात येणाऱ्या मालावर कमी कर आकारण्यात येई. इंग्लंडमधील माल यंत्रावर तयार होत असल्यामुळे तो कमी खर्चात व मोठ्या प्रमाणात तयार होई .अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योग बंद पडले .
इंग्रज सरकारचा पाठिंबा नसल्याने,व्यवस्थापनाचा अनुभव नसल्याने, आणि भांडवल नसल्यामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत.
1853 मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झाली.
1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला .
भारतामध्ये कोळसा, धातु, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगांची सुरुवात झाली .
एकोणिसाव्या शतकात युरोपातील बदलांचे पडसाद भारतात सुद्धा दिसू लागले .
इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती .1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली .
मॅक्सम्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म,भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता .
या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये निर्माण झाली.
लॉर्ड बेटिंग ने सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. लॉर्ड मेकॉले च्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली .पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले.
धन्यवाद !
….......................................….........................
कृपया अपने कमेंट्स अपने नाम के साथ जरूर भेजें
No comments:
Post a Comment